सांगली : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून गौरविण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि ग्रामपातळीवरील उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय मूल्यमापनात जलसंधारण, वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त उपक्रम, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता या घटकांचा आढावा घेण्यात आला. या निकषांवर सांगली जिल्हा परिषद अव्वल ठरल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.
या अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे (IAS), तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (IAS) तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) शशिकांत शिंदे यांच्या कार्यकाळातील उपक्रमांची नोंद घेण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, ‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला यापूर्वीही राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. सलग कामगिरीमुळे जिल्ह्यातील पर्यावरणीय उपक्रमांकडे राज्यस्तरावरून लक्ष वेधले गेले आहे.
हेही वाचा: पेठ–नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याची झडप; 12 वर्षीय मुलासह तिघे जखमी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










