सांगली : समाजातील उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
मेळाव्यात सहभागी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीच्या क्षेत्रानुसार प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, कर्ज प्रस्ताव सादर करण्याची पद्धत आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली.
तृतीयपंथीयांना केवळ योजनांची माहिती देणे नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सामाजिक गैरसमजांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
हेही वाचा : शहरातील ११ विकासकामे अजूनही रखडलेलीच; कंत्राटदारांना दंडात्मक कारवाईचा इशारा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










