सांगली : समाजातील उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
मेळाव्यात सहभागी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीच्या क्षेत्रानुसार प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, कर्ज प्रस्ताव सादर करण्याची पद्धत आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली.
तृतीयपंथीयांना केवळ योजनांची माहिती देणे नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सामाजिक गैरसमजांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
हेही वाचा : शहरातील ११ विकासकामे अजूनही रखडलेलीच; कंत्राटदारांना दंडात्मक कारवाईचा इशारा.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









