सांगली : जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा मुद्दा खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित केला. तंत्रज्ञानाचा फायदा नागरिकांना व्हावा, मात्र त्याचा भुर्दंड जनतेवर पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विद्युत समिती आढावा बैठकीत वीजपुरवठ्याची स्थिती, प्रलंबित कामे आणि नव्या वीजजोडण्यांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण आणि शहरी भागात अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.
यावेळी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू असले तरी अनेक नागरिकांकडून वीजबिल वाढल्याच्या तक्रारी येत असल्याचे खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
वीज व्यवस्थापन पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, मात्र त्याचा आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडू नये. वीजविषयक तक्रारी तत्परतेने सोडवाव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा: भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्यासाठी 2.77 लाखांपर्यंत अनुदान; ‘अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










