सांगली : जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा मुद्दा खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित केला. तंत्रज्ञानाचा फायदा नागरिकांना व्हावा, मात्र त्याचा भुर्दंड जनतेवर पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विद्युत समिती आढावा बैठकीत वीजपुरवठ्याची स्थिती, प्रलंबित कामे आणि नव्या वीजजोडण्यांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण आणि शहरी भागात अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.
यावेळी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू असले तरी अनेक नागरिकांकडून वीजबिल वाढल्याच्या तक्रारी येत असल्याचे खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
वीज व्यवस्थापन पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, मात्र त्याचा आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडू नये. वीजविषयक तक्रारी तत्परतेने सोडवाव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा: भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्यासाठी 2.77 लाखांपर्यंत अनुदान; ‘अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










