सांगली : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने १७ मार्च ते ३० मार्चदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून या काळात सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशानुसार नागरिकांना शस्त्रे, काठ्या किंवा इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच दगडफेक, स्फोटक पदार्थ, घोषणा देणे, गाणी किंवा वाद्य वाजवणे यांसारख्या कृतींनाही मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे फलक, चिन्हे किंवा प्रदर्शन करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतेही मोर्चे, सभा किंवा जमाव परवानगीशिवाय घेता येणार नाहीत.
दरम्यान, शासकीय कामकाज, धार्मिक विधी, अंत्यविधी आणि परीक्षा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हा आदेश जारी केला असून ३० मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार आहेत.
हेही वाचा: सांगली मनपाचा १०६५ कोटींचा अर्थसंकल्प; पाणी, स्वच्छता, लाईट व पर्यावरणासाठी मोठी तरतूद.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










