सांगली : वाढत्या महागाईमुळे विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात राज्य शासनाची ‘कन्यादान योजना’ राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह करणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.
कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना 20 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. ही रक्कम वधूच्या पालकांच्या नावाने धनादेशाद्वारे दिली जाते.
तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे 4 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. संस्थानी या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 10 जोडप्यांचा सामूहिक विवाह करणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना लागू आहे. त्यामुळे कमी खर्चात विवाह करण्यासाठी सांगली जिल्यातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांचेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीच्या ७ महिलांनी मिळवला दिल्लीत सन्मान; राष्ट्रीय मंचावर झळकली कामगिरी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










