Sangli News | सांगली : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या धनगर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू असून, या संघर्षात काही धनगर बांधवांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू पावलेले व्यक्ती बहुतांश कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत असल्याने त्यांच्या निधनामुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविका, शिक्षण आणि भविष्यातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच प्रत्येक पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.
या वेळी आमदार बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते. धनगर समाजाच्या न्यायहक्कांसाठी सुरू असलेला लढा ठामपणे आणि सातत्याने सुरू राहील, असेही आमदार पडळकर यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









