सांगली : शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित निबंध व घोषवाक्य स्पर्धेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक स्पर्धकांना आपली प्रवेशिका २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवता येणार आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीतील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक (खुला गट) या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. यापूर्वी स्पर्धेची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती. संबंधित कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने स्पर्धेची मुदत वाढविण्यात आली आहे.
“श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन कार्य” या विषयावर सुमारे ५०० ते ६०० शब्दांचा निबंध सादर करायचा असून त्याच अनुषंगाने घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपला निबंध किंवा घोषवाक्य नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवावे.
या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२३१-२६६२६०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व सन्मानपत्र देण्यात येणार असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










