सांगली : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यांकनात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डिजिटल सेवा सक्षमपणे राबवल्याबद्दल हा सन्मान मिळाला.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात कार्यालयाची वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, प्रशासकीय डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेनचा वापर तसेच GIS आधारित कामकाज अशा सात निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. २६ जानेवारी २०२६ रोजी या निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड जाहीर करण्यात आली होती.
निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवण्यात आलेल्या जिल्हा परिषद संवर्गाचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, या मूल्यांकनात पुणे जिल्हा परिषद प्रथम, सांगली दुसऱ्या क्रमांकावर तर ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदा अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या कार्यसंघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून, लवकरच सर्व विजेत्यांचा राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: सांगलीत राष्ट्रवादी (शरद पवार) सर्वात मोठा पक्ष; भाजप दुसऱ्या क्रमांकावर.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










