ईश्वरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषद गटांच्या निकालाकडे पाहता, एकूण 11 पैकी 8 गटांमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला असून महायुतीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
रेठरे हरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, पेठ, बोरगाव, बावची आणि येलूर या गटांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर चिकुर्डे मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवाराने विजय मिळवला. कामेरी गटात भाजप, वाळवा गटात शिवसेना (शिंदे गट) तर बागणी गटात रयत क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला.
हेही वाचा: कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व; जिल्हा परिषद व पंचायत समितीत बहुमत.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










