ईश्वरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषद गटांच्या निकालाकडे पाहता, एकूण 11 पैकी 8 गटांमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला असून महायुतीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
रेठरे हरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, पेठ, बोरगाव, बावची आणि येलूर या गटांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर चिकुर्डे मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवाराने विजय मिळवला. कामेरी गटात भाजप, वाळवा गटात शिवसेना (शिंदे गट) तर बागणी गटात रयत क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला.
हेही वाचा: कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व; जिल्हा परिषद व पंचायत समितीत बहुमत.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










