ईश्वरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषद गटांच्या निकालाकडे पाहता, एकूण 11 पैकी 8 गटांमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला असून महायुतीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
रेठरे हरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, पेठ, बोरगाव, बावची आणि येलूर या गटांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर चिकुर्डे मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवाराने विजय मिळवला. कामेरी गटात भाजप, वाळवा गटात शिवसेना (शिंदे गट) तर बागणी गटात रयत क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला.
हेही वाचा: कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व; जिल्हा परिषद व पंचायत समितीत बहुमत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










