Sangli Politics News: जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र; विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Jayant Patil Special Assembly Demand 2025

Sangli Politics News | सांगली : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र देत महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी केली आहे.

आमदार जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी व पूरामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली असून, काही ठिकाणी जमीनही खरडून वाहून गेली आहे. अनेक जनावरे दगावली, घरे कोसळली, तर काही नागरिकांचा जीव गेला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, “अशा वेळेस सरकारने भरीव मदत जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत राज्य सरकारकडून ठोस निर्णय होताना दिसत नाही. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा व्हावी आणि नुकसानभरपाईसाठी त्वरित पॅकेज जाहीर व्हावे, यासाठी विधानमंडळाचे विशेष अधिवेशन घेणे आवश्यक आहे.”

जयंत पाटील यांनी राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रात स्पष्ट केले आहे की, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले गेले पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने ही अधिकृत मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: झोपलेल्या पत्नीवर नवऱ्याने चाकूने वार करून केली हत्या; परिसरात एकच खळबळ.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा