‘शक्तीपीठ महामार्ग’ पुन्हा वादात; 19 गावांवर परिणामाचा दावा, 23 फेब्रुवारीला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
शक्तीपीठ महामार्गाविरोधात 23 फेब्रुवारीला बुधगाव ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा; शक्तीपीठ विरोधी कृती समितीचा निर्णय. | प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : नागपूर-गोवा (पवनार-पत्रादेवी) शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यावरून सांगली जिल्ह्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही भागात अलाइनमेंट बदलण्याचे संकेत दिल्यानंतरही शेतकरी संघटनांनी संपूर्ण प्रकल्प रद्द करण्याची मागणी कायम ठेवली आहे.

शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत 23 फेब्रुवारी रोजी बुधगाव येथून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे उमेश देशमुख म्हणाले, प्रस्तावित महामार्गामुळे जिल्ह्यातील सुमारे 19 गावांवर परिणाम होणार आहे.

नवीन आराखड्यानुसार प्रस्तावित महामार्ग सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव आणि वाळवा तालुक्यांमधून जाणार असल्याचे विरोधी समितीचे देशमुख यांनी सांगितले. सरकारने अलाइनमेंट बदलली तरी सिंचन क्षेत्र, शेती आणि पूरस्थितीचा धोका कायम राहील, असा दावा समितीने केला आहे.

दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी मूळ आराखड्यानुसार महामार्ग उभारण्याच्या समर्थनार्थ सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बैठका घेण्याची घोषणा केली आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात समर्थन आणि विरोध असे दोन स्पष्ट गट समोर येत असून, येत्या काही दिवसांत वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: दरवाजा निघाला अन् जीप शेतात पलटी; नांद्रे-सांगली मार्गावर अपघात सात जखमी, चालकावर गुन्हा दाखल.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा