कवठेमहांकाळ : तालुक्यातील अलकुड एम येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डिजिटल आयडेंटिटी प्रणालीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थी शाळेत आल्यावर आणि शाळा सुटल्यानंतर पालकांना मोबाईलवर त्वरित संदेश जातो.
विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ओळखपत्रावर स्कॅनर लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून सकाळी उपस्थितीवेळी स्कॅन केल्यानंतर संबंधित पालकांना विद्यार्थी शाळेत पोहोचल्याचा संदेश जातो. तसेच शाळा सुटल्यानंतर पुन्हा स्कॅनिंग केल्यावर विद्यार्थी शाळेतून घरी निघाल्याची माहिती पालकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे जाते.
शाळा प्रशासनाच्या मते, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक व शिक्षकांची चिंता कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अलकुड एम येथील अंगणवाडीतही अशाच प्रकारचा प्रयोग सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
डिजिटल आयडेंटिटी प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद अधिक अचूक होत असून, पालकांना त्यांची मुलं शाळेत पोहोचल्याची आणि शाळेतून घरी निघाल्याची थेट मोबाइलवर माहिती मिळत असल्याने पालकांमधून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा: 28 फेब्रुवारीपर्यंत कर भरा, नाहीतर वेतन थांबणार; आयुक्तांचा मनपा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









