Marriage Fraud: लग्न लावतो म्हणून पाच लाखांचा गंडा; सुपारी फुटली, नवरी बेपत्ता

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Marriage Fraud Atpadi Five Lakh Cheating Bride Missing (प्रातिनिधिक छायाचित्र)

Sangli News | आटपाडी : लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून दोन कुटुंबांची तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आला आहे. सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि काही दिवसांतच नवरीसह पसार झाले.

या प्रकरणी धनाजी शिवाजी कदम (वय 60, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनाजी भीमराव शिंदे (रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) आणि पोलू शंकर गिरी (रा. शेनीदळुप, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधून लग्न लावून देतो, असा दावा केला होता. त्यानुसार पोलू गिरीच्या मदतीने ‘आरती’ नावाच्या तरुणीला शितलादेवी मंदिर, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथे आणण्यात आले. तेथे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत फिर्यादीकडून 2 लाख 50 हजार रुपये रोख स्वीकारण्यात आले.

मात्र लग्न होण्यापूर्वीच संबंधित तरुणी दिघंची येथून अचानक निघून गेली. संशय बळावल्यानंतर अधिक चौकशी केली असता, असाच प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्याबाबतही घडल्याचे उघड झाले. आरोपींनी त्यांच्याकडूनही लग्न लावण्याचे आमिष दाखवून 2 लाख 50 हजार रुपये उकळले होते. मात्र तीच तरुणी अवघ्या 30 ते 40 दिवसांत सासर सोडून पसार झाल्याचे समोर आले.

फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धनाजी कदम यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी, विटा यांच्या लेखी परवानगीने 15 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिस तपास सुरू आहे.

हेही वाचा: ९० कोटींच्या निधीत सांगलीला डावलले? कोल्हापूरसह पाच महापालिकांना लाभ, सांगलीच्या पदरात शून्य.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा