Sangli Railway : यशवंतपूर–निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या सांगली थांब्यासाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र; पण निर्णय अद्याप प्रलंबित

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

सांगली : यशवंतपूर–निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12629/12630) ला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी झालेली नसल्याने हा विषय अद्याप प्रलंबित आहे.

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 ऑगस्ट 2024 रोजी रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सांगली जिल्ह्याचे आर्थिक, औद्योगिक व कृषी महत्त्व स्पष्ट केले आहे. सांगली हा साखर, हळद आणि द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा असून येथे सुमारे 30 साखर कारखाने, फाउंड्री, अभियांत्रिकी आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित अनेक उद्योग कार्यरत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पत्रात सांगली रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या व थांबणाऱ्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा आणि नवीन थांब्यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. यामध्ये संपर्क क्रांती एक्सप्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर कोचिंग टर्मिनल, पिट लाईन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अतिरिक्त तिकीट खिडक्या, चौकशी काउंटर, रिटायरिंग रूम, क्लोक रूम, पार्सल बुकिंग कार्यालय तसेच किर्लोस्करवाडी स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत समावेश करण्याबाबतही मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील प्रवासी, सामाजिक संघटना आणि रेल्वेप्रेमी गेल्या काही काळापासून या गाडीच्या थांब्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सोशल मीडियावरही या संदर्भातील पत्र पुन्हा चर्चेत आले आहे, मात्र रेल्वे बोर्डाकडून याबाबत अद्याप कोणताही निर्णय किंवा अधिकृत सूचना जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा