सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांच्या माव्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाचे नाव नारायण सुरेश पवार (वय २८, रा. वडर गल्ली, सांगली) असे आहे. रविवारी शहरातील एका पानटपरीवर मावा देण्याच्या कारणावरून नारायण पवार याचा काही तरुणांशी वाद झाला होता. या वादातून संशयितांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नारायण पवार याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी नारायण पवार याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्ह्याचे स्वरूप बदलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित हे परस्पर नातलग असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










