सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांत अडकले ; प्रशासन सतर्क

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
आखाती देशांमध्ये असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन सतर्क. (प्रतिनिधिक छायाचित्र)

सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काही नागरिक त्या देशांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांमध्ये वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे नातेवाईक किंवा परिचित आखाती तसेच पश्चिम आशियाई देशांमध्ये राहत असतील आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित तपशील महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) शेअर करण्यात आला आहे. पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून समन्वय सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी समन्वय साधला असून संबंधित माहिती भारतीय दूतावासापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क :

  • जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली – 0233-2600500
  • सांगली पोलिस नियंत्रण कक्ष – 0233-2672100
  • मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई – 9321587143

आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक असल्यास या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिक प्रश्न बातम्या येथे वाचा : Sangli Public Issue News Today.

हेही वाचा: सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा