सांगली : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान सांगली जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त’ परीक्षा प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. परीक्षा केंद्रांवर डिजिटल मॉनिटरिंग प्रणालीच्या माध्यमातून देखरेख केली जात असून त्यामुळे पारदर्शकता वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. डिजिटल वॉचच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवरील हालचालींवर बारकाईने नजर ठेवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
जिल्ह्यातील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांनीसुद्धा समन्वयाने काम करत परीक्षा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. डिजिटल देखरेखीची पद्धत पुढील काळातही सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: सोशल मीडिया चॅनेल विक्रीच्या आमिषाने लंगरपेठ मधील तरुणाची 1.95 लाखांची फसवणूक; इंदोरमधील संशयितास अटक.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









