मिरज : दुष्काळी जत तालुक्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा म्हैसाळ-जत विस्तारित उपसा सिंचन योजनेतील बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. प्रकल्पातील बोगद्याचा ‘ब्रेकथ्रू’ झाल्याने लाभ क्षेत्रातील 65 गावांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 26 हजार 500 हेक्टर असून पाणी वापर क्षमता 5 टीएमसी इतकी आहे. लाभ क्षेत्रात जत तालुक्यातील पूर्णतः वंचित 48 गावे आणि अंशतः वंचित 17 गावे अशी एकूण 65 गावे समाविष्ट आहेत.
₹1028.68 कोटींच्या निविदा कामापैकी सुमारे 57 किलोमीटर लांबीच्या कामांपैकी 51 किलोमीटर म्हणजेच 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. तीन पंपगृहांपैकी एकाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन पंपगृहांची कामे सुरू आहेत. प्रकल्पातील दोन वितरण कुंडांचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.
या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच जतच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार आहे. दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा: राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










