मिरज : दुष्काळी जत तालुक्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा म्हैसाळ-जत विस्तारित उपसा सिंचन योजनेतील बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. प्रकल्पातील बोगद्याचा ‘ब्रेकथ्रू’ झाल्याने लाभ क्षेत्रातील 65 गावांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 26 हजार 500 हेक्टर असून पाणी वापर क्षमता 5 टीएमसी इतकी आहे. लाभ क्षेत्रात जत तालुक्यातील पूर्णतः वंचित 48 गावे आणि अंशतः वंचित 17 गावे अशी एकूण 65 गावे समाविष्ट आहेत.
₹1028.68 कोटींच्या निविदा कामापैकी सुमारे 57 किलोमीटर लांबीच्या कामांपैकी 51 किलोमीटर म्हणजेच 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. तीन पंपगृहांपैकी एकाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन पंपगृहांची कामे सुरू आहेत. प्रकल्पातील दोन वितरण कुंडांचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.
या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच जतच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार आहे. दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा: राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










