मिरज : शहरातील इंदिरानगर व म्हाडा कॉलनी परिसरात पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार असून दोन दिवस पाणी पूर्णपणे बंद राहणार आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मालगाव रस्ता परिसरातील पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच टाकीची स्वच्छताही केली जाणार आहे.
या कामामुळे मंगळवार (24 मार्च) आणि बुधवार (25 मार्च) रोजी या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. सोमवार (23 मार्च) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होईल, त्यानंतर दुपारपासून दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: मिरजेत पैशांच्या वादातून कोयत्याने मारहाण; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










