सांगली : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित 751 कोटी 8 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यावर मुंबईत राज्यस्तरीय बैठक पार पडली. राज्याच्या नियोजन विभागाने सुरुवातीला 545 कोटी 8 लाख रुपयांचा कमाल नियतव्यय कळवला होता; मात्र जिल्ह्याच्या स्थानिक गरजांचा विचार करून 206 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाढीव मागणीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य तितका अतिरिक्त निधी देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही बैठकीत दिली.
बैठकीत जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा, सिंचन, पर्यटन, औद्योगिक विकास आणि उत्पन्नवाढीशी संबंधित प्रकल्पांवर चर्चा झाली. कवलापूर विमानतळ, मल्टीलॉजिस्टिक्स पार्क, तसेच पर्यटनवाढीच्या संधींबाबत मुद्दे मांडण्यात आले.
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याने पुढील टप्प्यात सौरऊर्जेचा वापर वाढवण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. चांदोली अभयारण्य व कृषी पर्यटनाला चालना देण्याबाबतही संकल्प मांडण्यात आल्या.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मागील पाच वर्षांतील पूर्ण झालेल्या कामांचे सादरीकरण करत नवीन आराखड्यातील प्रस्तावांची माहिती दिली. वाढीव निधीबाबतचा अंतिम निर्णय राज्यस्तरावर घेतला जाणार आहे.
हेही वाचा: महिलांना थेट प्रशासनासमोर तक्रारी मांडण्याची संधी; 16 फेब्रुवारीला सांगलीत महिला लोकशाही दिन.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










