सांगली : शिवजयंतीनिमित्त मारुती चौक परिसरात झालेल्या कार्यक्रमांनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवली.
मारुती चौक येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात विशेष स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः झाडू हातात घेत स्वच्छतेत सहभाग घेतला. उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रशासन आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या कार्यक्रमांनंतर अनेकदा प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, फुले आणि इतर कचरा रस्त्यावर विखुरलेला दिसतो. त्यामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. अस्वछता टाळण्यासाठी ‘कचरामुक्त उत्सव’ ही संकल्पना पुढे नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही श्रमदान केले.
दरम्यान, नागरिकांनीही उत्सवानंतर स्वच्छतेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा: नोकरीची संधी! सांगलीतील क्रेडिट सोसायटीत 32 पदांसाठी भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी संधी.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










