सांगली : मतमोजणीनंतर शहरात हुल्लडबाजी व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात सांगली पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. निष्काळजीपणे दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 328 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 48,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मतमोजणीनंतर शहरात गोंधळ, वेगात वाहन चालवणे व नियमभंगाच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने ही कारवाई मोहीम राबवली. वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेदरकार वाहन चालवणे आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारांना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.
हेही वाचा: मिरज तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक; उमेदवारांच्या मुलाखती सुरु.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










