सांगली : समाजातील उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
मेळाव्यात सहभागी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीच्या क्षेत्रानुसार प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, कर्ज प्रस्ताव सादर करण्याची पद्धत आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली.
तृतीयपंथीयांना केवळ योजनांची माहिती देणे नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सामाजिक गैरसमजांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
हेही वाचा : शहरातील ११ विकासकामे अजूनही रखडलेलीच; कंत्राटदारांना दंडात्मक कारवाईचा इशारा.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










