सांगली : समाजातील उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
मेळाव्यात सहभागी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीच्या क्षेत्रानुसार प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, कर्ज प्रस्ताव सादर करण्याची पद्धत आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली.
तृतीयपंथीयांना केवळ योजनांची माहिती देणे नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सामाजिक गैरसमजांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
हेही वाचा : शहरातील ११ विकासकामे अजूनही रखडलेलीच; कंत्राटदारांना दंडात्मक कारवाईचा इशारा.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










