Sangli News | सांगली : हळदीच्या वायदेबाजाराच्या माध्यमातून मुठभर व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा गंभीर आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत वायदेबाजाराचा गैरवापर करून हळदीचे दर कृत्रिमरित्या पाडले गेले, ज्यामुळे देशभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सांगलीसह हळद उत्पादक जिल्हे सर्वाधिक प्रभावित
राज्यात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि वाशिम हे हळद उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत. देशात सर्वाधिक हळद उत्पादन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असून, राज्यात दरवर्षी सुमारे ३ ते ३.५ लाख टन हळदीचे उत्पादन होते. यावर्षी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता असताना, बाजारात भाव वाढण्याऐवजी वायदेबाजारात दर पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिक बाजार व वायदेबाजारातील दरांमध्ये तफावत
राजू शेट्टी यांनी नमूद केले की,
स्थानिक बाजारात हळदीचे दर चांगले असतानाही NCDEX वरील वायदेबाजारात कृत्रिमरित्या कमी दर दाखवले जात आहेत. वायदेबाजारात खरेदी करण्यात आलेल्या हळदीची गुणवत्ता, दर्जा आणि गोदामांतील प्रत्यक्ष स्थिती तपासल्यास, ठरवलेल्या मापदंडांमध्ये मोठी तफावत आढळते, असा आरोप त्यांनी केला आहे.
साखरेप्रमाणे हळद वायदेबाजारातून मुक्त करण्याची मागणी
शेट्टी यांनी यापूर्वी साखरेला वायदेबाजारातून मुक्त केल्याचा दाखला देत सांगितले की, त्या निर्णयामुळे साखरेचे दर स्थिर राहिले आणि शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा झाला.
हळदही वायदेबाजारातून वगळल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यावी व हळद बाजारातील संभाव्य गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना; शहरात जुन्या वादातून हत्या, तर जतमध्ये संशयास्पद मृत्यू.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









