सांगली : शहरातील काही भागांत अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत विविध प्रभागांमध्ये वेळेवर आणि योग्य दाबाने पाणी पोहोचत आहे का, याची तपासणी करण्यात आली. पाणी गळती शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी येणाऱ्या भागांमध्ये तांत्रिक सुधारणा त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आले.
पाईप इन्स्पेक्टर व व्हॉलमन यांच्यावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणी वितरणाची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची निश्चित कालमर्यादेत सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून पाणीपुरवठा नियोजन अधिक सक्षम व व्यापक करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा; तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










