सांगली : शहरातील काही भागांत अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत विविध प्रभागांमध्ये वेळेवर आणि योग्य दाबाने पाणी पोहोचत आहे का, याची तपासणी करण्यात आली. पाणी गळती शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी येणाऱ्या भागांमध्ये तांत्रिक सुधारणा त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आले.
पाईप इन्स्पेक्टर व व्हॉलमन यांच्यावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणी वितरणाची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची निश्चित कालमर्यादेत सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून पाणीपुरवठा नियोजन अधिक सक्षम व व्यापक करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा; तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










