सांगली जि.प. सत्तास्थापनेचा निर्णय मुंबईत; अध्यक्षपदासाठी अजित पवार गटाचा आग्रह, महायुतीसमोर नवा पेच

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
जिल्हा परिषद सांगली इमारत. | संग्रहित छायाचित्र

सांगली : येत्या दोन दिवसांत मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगली जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होणार आहे. सोमवारी मिरजेतील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अध्यक्षपदासाठी स्पष्ट आग्रह धरल्याने सांगलीतील राजकीय समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्यांमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ ३० असून महाविकास आघाडीला बहुमतासाठी केवळ एका सदस्याची गरज आहे. दुसरीकडे भाजपकडे जनसुराज्य व रयत क्रांतीसह १८ सदस्य आहेत. स्पष्ट बहुमतासाठी महायुतीला अजून १३ सदस्यांची आवश्यकता आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ६ आणि शिवसेना (शिंदे गट) चे ७ सदस्य निवडून आल्याने हे दोन्ही गट सध्या ‘किंगमेकर’ भूमिकेत आहेत.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला संधी द्यावी, या मागणीवर घटक पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतरच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि सभापती पदांवर तडजोड होणार की एखादा गट वेगळी भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुंबईतील बैठक सांगलीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा: रविवार आणि महाशिवरात्र एकत्र; हरिपूरमध्ये भाविकांची लाट, संगमेश्वर मंदिरात रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा