सांगली : सांगली शहरासाठी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या प्रकरणांबाबत झालेल्या बैठकीत एकूण 118 प्रकरणांपैकी 94 प्रकरणांना पात्रता देण्यात आली आहे.
तहसिलदार तथा संजय गांधी योजना सांगली शहरच्या अध्यक्ष शुभांगी कनवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी शाखेत पार पडली. बैठकीत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एकूण 85 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 64 प्रकरणे पात्र ठरविण्यात आली, तर 21 प्रकरणे अपात्र घोषित करण्यात आली.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत एकूण 33 प्रकरणांपैकी 30 प्रकरणांना पात्रता देण्यात आली असून 3 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. अशा प्रकारे दोन्ही योजनांमधील मिळून एकूण 118 पैकी 94 प्रकरणे पात्र ठरली.
या बैठकीस महसूल सहाय्यक संदीप पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. पुढील बैठक मार्च 2026 महिन्यात होणार असून संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात शासकीय वसतिगृहासाठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 फेब्रुवारी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










