सांगल : विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात गेल्या चार दिवसांपासून नळाद्वारे बंद असलेला पाणीपुरवठा आज रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आज सकाळी ८:५१ वाजता पाणीपुरवठा खंडित असल्याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, रात्री उशिरा परिसरात पाणी येण्यास सुरुवात झाली. पाणीपुरवठा सुरू झाल्याने पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र चार दिवस चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना पर्यायी पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: सांगली बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईलची चोरी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










