सांगल : विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात गेल्या चार दिवसांपासून नळाद्वारे बंद असलेला पाणीपुरवठा आज रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आज सकाळी ८:५१ वाजता पाणीपुरवठा खंडित असल्याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, रात्री उशिरा परिसरात पाणी येण्यास सुरुवात झाली. पाणीपुरवठा सुरू झाल्याने पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र चार दिवस चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना पर्यायी पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: सांगली बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईलची चोरी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










