ईश्वरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषद गटांच्या निकालाकडे पाहता, एकूण 11 पैकी 8 गटांमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला असून महायुतीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
रेठरे हरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, पेठ, बोरगाव, बावची आणि येलूर या गटांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर चिकुर्डे मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवाराने विजय मिळवला. कामेरी गटात भाजप, वाळवा गटात शिवसेना (शिंदे गट) तर बागणी गटात रयत क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला.
हेही वाचा: कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व; जिल्हा परिषद व पंचायत समितीत बहुमत.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









