सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी प्रमुख राजकीय आघाड्या आणि युतींमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत; मात्र पक्षीय युती होणार की पक्ष स्वबळावर लढणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर जागांची मागणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे. भाजप ५० हून अधिक जागांवर दावा करत असल्याचे सांगितले जात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुमारे ३० जागांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मागण्यांवर दोन्ही पक्षांचे अद्याप एकमत होत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मिरजेत अजित पवार गटात आजी-माजी नगरसेवक तसेच माजी महापौरांचा प्रवेश झाल्यामुळे अजित पवार गटाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षित जागावाटप न झाल्यास अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीतही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जागावाटपावरून मतभेद कायम असल्याचे दिसून येते.
निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत तर हा जागावाटपाचा तिढा सुटेल की नाही, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. त्यामुळे सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीत पक्षीय युती की स्वबळ, हे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे
हेही वाचा: सांगली पोलिस ॲक्शन मोडवर; दोन टोळ्यांवर ‘मोक्का’चा प्रस्ताव, 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










