सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी प्रमुख राजकीय आघाड्या आणि युतींमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत; मात्र पक्षीय युती होणार की पक्ष स्वबळावर लढणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर जागांची मागणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे. भाजप ५० हून अधिक जागांवर दावा करत असल्याचे सांगितले जात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुमारे ३० जागांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मागण्यांवर दोन्ही पक्षांचे अद्याप एकमत होत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मिरजेत अजित पवार गटात आजी-माजी नगरसेवक तसेच माजी महापौरांचा प्रवेश झाल्यामुळे अजित पवार गटाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षित जागावाटप न झाल्यास अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीतही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जागावाटपावरून मतभेद कायम असल्याचे दिसून येते.
निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत तर हा जागावाटपाचा तिढा सुटेल की नाही, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. त्यामुळे सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीत पक्षीय युती की स्वबळ, हे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे
हेही वाचा: सांगली पोलिस ॲक्शन मोडवर; दोन टोळ्यांवर ‘मोक्का’चा प्रस्ताव, 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










