तीन वर्षांत मोठ्या परताव्याचे आमिष; सांगलीत लाखोंची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली : तीन वर्षांत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांकडून सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये गुंतवणूक करून घेतल्याप्रकरणी दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दाजी कृष्णा पाटील (वय ६८, रा. जयसिंगपूर) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, संजय बाळू डोळस (रा. पुणे) आणि राम सदाशिव कांबळे (रा. तासगाव) यांनी ‘रॅपिड टेक्नॉलॉजी’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन वर्षांत मोठा परतावा मिळेल, असे सांगून पाटील यांच्याकडून १ लाख १९ हजार रुपये गुंतवणूक करून घेतली.

यानंतर पाटील यांचे मित्र मनोज साळसकर, संदेश कांबळे आणि श्यामसुंदर सूर्यवंशी यांच्याकडूनही रक्कम गुंतवण्यात आली. एकूण गुंतवणूक रक्कम सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

काही काळानंतर विश्रामबाग परिसरातील संबंधित कंपनीचे कार्यालय बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर तक्रारदाराला गुंतवलेल्या रकमेपैकी काही रक्कम परत करण्यात आली; मात्र उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, विश्रामबाग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाच : आमराई क्लब येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या संयुक्त मुलाखती पार.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा