सांगली : तीन वर्षांत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांकडून सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये गुंतवणूक करून घेतल्याप्रकरणी दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दाजी कृष्णा पाटील (वय ६८, रा. जयसिंगपूर) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, संजय बाळू डोळस (रा. पुणे) आणि राम सदाशिव कांबळे (रा. तासगाव) यांनी ‘रॅपिड टेक्नॉलॉजी’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन वर्षांत मोठा परतावा मिळेल, असे सांगून पाटील यांच्याकडून १ लाख १९ हजार रुपये गुंतवणूक करून घेतली.
यानंतर पाटील यांचे मित्र मनोज साळसकर, संदेश कांबळे आणि श्यामसुंदर सूर्यवंशी यांच्याकडूनही रक्कम गुंतवण्यात आली. एकूण गुंतवणूक रक्कम सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
काही काळानंतर विश्रामबाग परिसरातील संबंधित कंपनीचे कार्यालय बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर तक्रारदाराला गुंतवलेल्या रकमेपैकी काही रक्कम परत करण्यात आली; मात्र उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, विश्रामबाग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाच : आमराई क्लब येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या संयुक्त मुलाखती पार.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










