सांगली : तीन वर्षांत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांकडून सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये गुंतवणूक करून घेतल्याप्रकरणी दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दाजी कृष्णा पाटील (वय ६८, रा. जयसिंगपूर) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, संजय बाळू डोळस (रा. पुणे) आणि राम सदाशिव कांबळे (रा. तासगाव) यांनी ‘रॅपिड टेक्नॉलॉजी’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन वर्षांत मोठा परतावा मिळेल, असे सांगून पाटील यांच्याकडून १ लाख १९ हजार रुपये गुंतवणूक करून घेतली.
यानंतर पाटील यांचे मित्र मनोज साळसकर, संदेश कांबळे आणि श्यामसुंदर सूर्यवंशी यांच्याकडूनही रक्कम गुंतवण्यात आली. एकूण गुंतवणूक रक्कम सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
काही काळानंतर विश्रामबाग परिसरातील संबंधित कंपनीचे कार्यालय बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर तक्रारदाराला गुंतवलेल्या रकमेपैकी काही रक्कम परत करण्यात आली; मात्र उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, विश्रामबाग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाच : आमराई क्लब येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या संयुक्त मुलाखती पार.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









