Sangli Panchayat Raj : ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानाच्या जनजागृतीसाठी सिने कलाकारांचा सांगली दौरा; तीन गावांत कार्यक्रम

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, रायगड

सांगली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जनजागृतीसाठी सांगली जिल्ह्यात सिने व दूरचित्रवाणी क्षेत्रातील कलाकारांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत अभिनेते संदीप पाठक आणि ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब हे शुक्रवारी (दि. 9) जिल्ह्यातील काही गावांना भेट देणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी वाळवा तालुक्यातील येडनिपाणी, दुपारी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी, तर त्यानंतर खानापूर–विटा तालुक्यातील आळसंद येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये हे कलाकार सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान ग्रामस्थांशी थेट संवाद साधत अभियानाची उद्दिष्टे, ग्रामपंचायतींची भूमिका, लोकसहभागाचे महत्त्व तसेच शाश्वत विकासाशी संबंधित बाबी मांडल्या जाणार आहेत.

सिने कलाकारांविषयी ग्रामीण भागात असलेले प्रेम लक्षात घेता, त्यांच्या सहभागातून अभियानाबाबतची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल, असा प्रशासनाचा उद्देश आहे. संवाद आणि सादरीकरणाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सकारात्मक जनजागृती करण्यावर या कार्यक्रमांमध्ये भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी सुरू असून, कलाकारांच्या या दौऱ्यामुळे अभियानाच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या जनजागृती कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीसह महाराष्ट्रातील पर्यटकांनी सागरेश्वर अभयारण्याला भेट द्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा