सांगली : सांगली शहर व परिसरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांचे वीज बिल अचानक वाढून येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे वीज वापरात कोणताही बदल नसतानाही मागील महिन्यांच्या तुलनेत वाढीव बिले येत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
काही नागरिकांच्या मते, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी दरमहा ५०० ते ८०० रुपयांपर्यंत येणारे वीज बिल आता १,२०० रुपये ते थेट १,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. वीज वापर पूर्वीइतकाच असूनही बिलात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत तसेच नवीन मिटरच्या बिल आकारणी प्रक्रियेबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे. अनेकांनी महावितरणकडे याबाबत तक्रारी नोंदविल्या असून, वाढीव बिलांचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यापूर्वीही स्मार्ट मीटर बसविणे व वीज दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. स्मार्ट मीटर केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळेच बसविले जात असून, जबरदस्तीने मीटर लावले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता.
स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्षात वीज बिलात वाढ होत आहे की मोजणी पद्धतीत बदल झाला आहे, याबाबत महावितरणने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा: सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी; देशात प्रथम क्रमांक.
- वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू
- सांगलीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; प्रसूतीनंतर नवजात बाळाला सोडून आई गायब
- माधवनगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू









