सांगली : सांगली शहर व परिसरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांचे वीज बिल अचानक वाढून येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे वीज वापरात कोणताही बदल नसतानाही मागील महिन्यांच्या तुलनेत वाढीव बिले येत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
काही नागरिकांच्या मते, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी दरमहा ५०० ते ८०० रुपयांपर्यंत येणारे वीज बिल आता १,२०० रुपये ते थेट १,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. वीज वापर पूर्वीइतकाच असूनही बिलात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत तसेच नवीन मिटरच्या बिल आकारणी प्रक्रियेबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे. अनेकांनी महावितरणकडे याबाबत तक्रारी नोंदविल्या असून, वाढीव बिलांचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यापूर्वीही स्मार्ट मीटर बसविणे व वीज दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. स्मार्ट मीटर केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळेच बसविले जात असून, जबरदस्तीने मीटर लावले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता.
स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्षात वीज बिलात वाढ होत आहे की मोजणी पद्धतीत बदल झाला आहे, याबाबत महावितरणने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा: सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी; देशात प्रथम क्रमांक.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










