76 लाख टन ऊस गाळपानंतर सांगलीतील साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात; फेब्रुवारीअखेरीस कारखाने बंद होणार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात. (प्रतिनिधिक छायाचित्र) | Sangli Today

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून फेब्रुवारीअखेरीस बहुतांश कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. हंगाम कमी दिवसांत आटोपत असल्याने उर्वरित उसाचे नियोजन आणि थकबाकीवर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७६ लाख ६ हजार ४५४ टन ऊस गाळप करून ८० लाख २७ हजार ८४७ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. १०.४८ टक्के सरासरी साखर उतारा नोंदवला गेला आहे.

उताऱ्यात राजारामबापू पाटील यांचे वाटेगाव युनिट १२.५३ टक्क्यांसह आघाडीवर आहे, तर ऊस गाळपाच्या प्रमाणात सोनहिरा साखर कारखाना (सुमारे ९.३९ लाख टन) पुढे आहे.

काही कारखान्यांनी बंद करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. वाटेगाव युनिट ८ फेब्रुवारीला बंद झाले असून, साखराळे, कारंदवाडी आणि जत युनिट १७ फेब्रुवारीपर्यंत गाळप थांबवणार असल्याची माहिती आहे. ‘क्रांती’ कुंडल १६ फेब्रुवारीला, तर सोनहिरा कारखाना २० फेब्रुवारीच्या आसपास गाळप पूर्ण करणार आहे.

यंदा अनेक कारखान्यांचा हंगाम १०२ ते १११ दिवसांत आटोपला आहे. पूर्वी १५० दिवस चालणारा गाळप हंगाम गेल्या काही वर्षांत १२० दिवसांवर आला आहे. यंदा त्यापेक्षाही कमी कालावधीत गाळप संपत असल्याने पुढील वर्षी हंगाम आणखी कमी दिवसांचा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता उर्वरित उसाची तोड, आणि देयकांच्या प्रक्रियेवर आहे.

हेही वाचा: कवलापूर विमानतळाचा मुहूर्त जवळ? केंद्राची टीम पाहणीला, जिल्ह्यात उत्सुकता वाढली.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा