सांगली : नागपूर-गोवा (पवनार-पत्रादेवी) शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यावरून सांगली जिल्ह्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही भागात अलाइनमेंट बदलण्याचे संकेत दिल्यानंतरही शेतकरी संघटनांनी संपूर्ण प्रकल्प रद्द करण्याची मागणी कायम ठेवली आहे.
शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत 23 फेब्रुवारी रोजी बुधगाव येथून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे उमेश देशमुख म्हणाले, प्रस्तावित महामार्गामुळे जिल्ह्यातील सुमारे 19 गावांवर परिणाम होणार आहे.
नवीन आराखड्यानुसार प्रस्तावित महामार्ग सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव आणि वाळवा तालुक्यांमधून जाणार असल्याचे विरोधी समितीचे देशमुख यांनी सांगितले. सरकारने अलाइनमेंट बदलली तरी सिंचन क्षेत्र, शेती आणि पूरस्थितीचा धोका कायम राहील, असा दावा समितीने केला आहे.
दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी मूळ आराखड्यानुसार महामार्ग उभारण्याच्या समर्थनार्थ सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बैठका घेण्याची घोषणा केली आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात समर्थन आणि विरोध असे दोन स्पष्ट गट समोर येत असून, येत्या काही दिवसांत वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा: दरवाजा निघाला अन् जीप शेतात पलटी; नांद्रे-सांगली मार्गावर अपघात सात जखमी, चालकावर गुन्हा दाखल.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









