सांगली : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान सांगली जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त’ परीक्षा प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. परीक्षा केंद्रांवर डिजिटल मॉनिटरिंग प्रणालीच्या माध्यमातून देखरेख केली जात असून त्यामुळे पारदर्शकता वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. डिजिटल वॉचच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवरील हालचालींवर बारकाईने नजर ठेवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
जिल्ह्यातील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांनीसुद्धा समन्वयाने काम करत परीक्षा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. डिजिटल देखरेखीची पद्धत पुढील काळातही सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: सोशल मीडिया चॅनेल विक्रीच्या आमिषाने लंगरपेठ मधील तरुणाची 1.95 लाखांची फसवणूक; इंदोरमधील संशयितास अटक.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










