कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर परिसरात पूर्वीच्या भांडणाच्या रागातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार, दि. 24 रोजी घडली. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जखमींमध्ये रवींद्र माळी (वय 34), प्रमोद माने आणि अविनाश देशमुख यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
संशयितांनी धारदार शस्त्रे व लाकडी दांडक्यांचा वापर करून हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.
कुपवाड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा: शाळा खोल्यांच्या बिलासाठी 88 हजारांची लाच; जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










