कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर परिसरात पूर्वीच्या भांडणाच्या रागातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार, दि. 24 रोजी घडली. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जखमींमध्ये रवींद्र माळी (वय 34), प्रमोद माने आणि अविनाश देशमुख यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
संशयितांनी धारदार शस्त्रे व लाकडी दांडक्यांचा वापर करून हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.
कुपवाड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा: शाळा खोल्यांच्या बिलासाठी 88 हजारांची लाच; जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










