सांगली : शेती करताना अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा गंभीर अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच अपघातात दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास 2 लाख रुपये अनुदान मिळते.
अपघातात एक डोळा आणि एक हात किंवा पाय गमावल्यास 2 लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक हात किंवा पाय गमावल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हेही वाचा: सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










