सांगली : शेती करताना अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा गंभीर अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच अपघातात दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास 2 लाख रुपये अनुदान मिळते.
अपघातात एक डोळा आणि एक हात किंवा पाय गमावल्यास 2 लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक हात किंवा पाय गमावल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हेही वाचा: सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक.
- आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ चित्रपट; राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा
- आष्टा-इस्लामपूर रोडवर भरधाव दुचाकीची धडक; तरुण गंभीर जखमी
- अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
- सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती
- कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू









