Sangli Politics News: जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र; विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Jayant Patil Special Assembly Demand 2025

Sangli Politics News | सांगली : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र देत महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी केली आहे.

आमदार जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी व पूरामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली असून, काही ठिकाणी जमीनही खरडून वाहून गेली आहे. अनेक जनावरे दगावली, घरे कोसळली, तर काही नागरिकांचा जीव गेला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, “अशा वेळेस सरकारने भरीव मदत जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत राज्य सरकारकडून ठोस निर्णय होताना दिसत नाही. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा व्हावी आणि नुकसानभरपाईसाठी त्वरित पॅकेज जाहीर व्हावे, यासाठी विधानमंडळाचे विशेष अधिवेशन घेणे आवश्यक आहे.”

जयंत पाटील यांनी राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रात स्पष्ट केले आहे की, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले गेले पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने ही अधिकृत मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: झोपलेल्या पत्नीवर नवऱ्याने चाकूने वार करून केली हत्या; परिसरात एकच खळबळ.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा