ईश्वरपूर : पेठ-सांगली मार्गावरील ईश्वरपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 50 वर्षीय पादचारी ध्रुवकुमार मधुकर कदम (रा. मसुचीवाडी) यांचा मृत्यू झाला. ते दिव्यांग असून पेन्शन काढण्यासाठी ईश्वरपूरला आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुवकुमार कदम हे बसस्थानकातून बाहेर पडून बँकेकडे चालत जात असताना पेठकडून येणाऱ्या दुचाकीने (एमएच 10 एटी 5767) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत ते रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघातात दुचाकी चालक संग्राम रामदास पाटील (वय 24, रा. बुधगाव, ता. मिरज) हाही गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुपारी ध्रुवकुमार कदम यांचा मृत्यू झाला.
कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ईश्वरपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा: २५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; राजवाड्यात खोकी हटवण्यावरून महापालिका-व्यावसायिक आमनेसामने.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









