इस्लामपूरात मुसळधार पावसाने आठवडा बाजार उद्ध्वस्त; भाजीपाल्याचे मोठे नुकसान, शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये संताप

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Islampur Heavy Rain Weekly Market Damage

इस्लामपूर (सांगली): रविवारी दुपारी इस्लामपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारात हाहाकार माजला. जयहिंद व अंबिका देवालय परिसरात भरलेल्या बाजारात गटारीतील पाणी रस्त्यावर आले आणि पाण्यात टोमॅटो, भेंडी, दोडका, वांगी यांसह मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शहरातील मुख्य भाजी मार्केटच्या इमारतिचे बांधकाम सुरू असल्याने मागील महिनाभरापासून गुरुवार व रविवारचा आठवडा बाजार जयहिंद चित्रमंदिर व अंबिका मंदिर परिसरातील रस्त्यांवर भरवला जात आहे. मात्र हा परिसर उतारावर असल्याने आझाद चौक, डांगे चौक आणि तहसील कचेरी चौक येथील पाणी थेट बाजार परिसरात ओसंडून वाहते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हीच परिस्थिती निर्माण झाली आणि गटारे तुंबल्याने रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. परिणामी शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला व फळांचा माल पाण्यात वाहून गेला.

या घटनेमुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या विक्रेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागी पुन्हा आपला माल लावला. पालिका प्रशासनाकडे या गंभीर समस्येवर कोणताही ठोस उपाय नाही अशी टीका व्यापाऱ्यांनी केली.

🔴 हेही वाचा 👉 रुग्णालयातून पळालेल्या तरुणाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; आत्महत्या की हत्या, तपास सुरू.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा