इस्लामपूरात मुसळधार पावसाने आठवडा बाजार उद्ध्वस्त; भाजीपाल्याचे मोठे नुकसान, शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये संताप

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Islampur Heavy Rain Weekly Market Damage

इस्लामपूर (सांगली): रविवारी दुपारी इस्लामपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारात हाहाकार माजला. जयहिंद व अंबिका देवालय परिसरात भरलेल्या बाजारात गटारीतील पाणी रस्त्यावर आले आणि पाण्यात टोमॅटो, भेंडी, दोडका, वांगी यांसह मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शहरातील मुख्य भाजी मार्केटच्या इमारतिचे बांधकाम सुरू असल्याने मागील महिनाभरापासून गुरुवार व रविवारचा आठवडा बाजार जयहिंद चित्रमंदिर व अंबिका मंदिर परिसरातील रस्त्यांवर भरवला जात आहे. मात्र हा परिसर उतारावर असल्याने आझाद चौक, डांगे चौक आणि तहसील कचेरी चौक येथील पाणी थेट बाजार परिसरात ओसंडून वाहते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हीच परिस्थिती निर्माण झाली आणि गटारे तुंबल्याने रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. परिणामी शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला व फळांचा माल पाण्यात वाहून गेला.

या घटनेमुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या विक्रेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागी पुन्हा आपला माल लावला. पालिका प्रशासनाकडे या गंभीर समस्येवर कोणताही ठोस उपाय नाही अशी टीका व्यापाऱ्यांनी केली.

🔴 हेही वाचा 👉 रुग्णालयातून पळालेल्या तरुणाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; आत्महत्या की हत्या, तपास सुरू.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.