सांगली : सांगली जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून किमान तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा, कोल्हापूर आणि विभागीय कृषी संशोधन केंद्राने जारी केलेल्या अॅग्रोमेट सल्ला बुलेटिननुसार, शेतकऱ्यांनी पिके आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस सांगली जिल्ह्यात आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता नगण्य आहे. मात्र रात्री आणि पहाटेच्या वेळेत तापमानात लक्षणीय घट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, रब्बी ज्वारी तसेच भाजीपाला पिकांवर थंडीचा परिणाम होऊ शकतो.
कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार, थंडीपासून संरक्षणासाठी पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, कोवळ्या पिकांवर थंडीचा ताण येऊ नये यासाठी सकाळच्या वेळेत हलके सिंचन करावे. द्राक्ष, ऊस आणि फळबागांमध्ये कीड व रोग व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, पशुधनासाठीही विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रात्री जनावरे उघड्यावर बांधू नयेत, गोठ्यात थंडीपासून संरक्षणाची व्यवस्था करावी तसेच पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध ठेवावे, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानातील बदल लक्षात घेऊन शेती कामांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: मिरजेत बेदाणा व्यापाऱ्याला गंडा; 75 लाखांची फसवणूक.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










