जत : जत तालुक्यातील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात वनविभागाचे हंगामी वॉचमन जागीच ठार झाले. ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत दिलीप मारुती जाधव (वय ३५, रा. तोळबोळवस्ती, मुचंडी, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप जाधव हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून वनविभागात हंगामी वॉचमन म्हणून कार्यरत होते. मुचंडी गावालगत असलेल्या वनक्षेत्रात देखरेखीचे काम आटोपून ते सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्याच वेळी जतहून विजापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दिलीप जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत जाधव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जत पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: कवलापूर विमानतळाबाबत नागरिकांचे थेट प्रश्न; सरकार उत्तर देणार का?.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










