जत : जत तालुक्यातील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात वनविभागाचे हंगामी वॉचमन जागीच ठार झाले. ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत दिलीप मारुती जाधव (वय ३५, रा. तोळबोळवस्ती, मुचंडी, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप जाधव हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून वनविभागात हंगामी वॉचमन म्हणून कार्यरत होते. मुचंडी गावालगत असलेल्या वनक्षेत्रात देखरेखीचे काम आटोपून ते सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्याच वेळी जतहून विजापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दिलीप जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत जाधव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जत पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: कवलापूर विमानतळाबाबत नागरिकांचे थेट प्रश्न; सरकार उत्तर देणार का?.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










