वाळवा तालुक्यातील चिमुकली कराडमध्ये सुखरूप सापडली; बिबट्याचा संशय खोटा, अपहरणाच्या दिशेने पोलिस तपास सुरू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
वाळवा तालुक्यातील चिमुकली कराडमध्ये सुखरूप सापडली. | छायाचित्र : संग्रहित

वाळवा : कार्वे (ता. वाळवा) येथून अंगणात खेळताना अचानक बेपत्ता झालेली पाच वर्षांची चिमुकली अखेर कराड परिसरात सुखरूप सापडल्याने कुटुंबियांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवातीला बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र पोलिस तपासात हा अंदाज खोटा ठरला असून, मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्यन्सी प्रकाश चव्हाण (वय ५) ही लहान मुलगी रविवारी सायंकाळी आपल्या आजोबांच्या शेतातील घराच्या अंगणात खेळत होती. तिची आई तिला जेवण भरवत होती पाणी आणण्यासाठी आई घरात गेली असता काही क्षणांतच आर्यन्सी अंगणातून गायब झाल्याचे लक्षात आले. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलिस, महसूल विभाग आणि रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत तसेच सोमवारी सकाळीही ड्रोनच्या साहाय्याने परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही बिबट्याचे ठोस पुरावे न आढळल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलून कराड परिसरात शोध घेऊन आर्यन्सीला सुखरूप ताब्यात घेतले. सध्या ती कुरळप पोलिसांच्या ताब्यात आहे.

या प्रकरणी मुलीचे आजोबा कृष्णात पाटील यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली असून, नेमके कोण व कोणत्या उद्देशाने मुलीला घेऊन गेले, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कुरळप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांनी सांगितले की, “मुलगी सुरक्षित आहे. या प्रकरणात अपहरणाचा प्राथमिक संशय असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल.”

हेही वाचा: सांगलीत बारावीच्या परीक्षेवर डिजिटल वॉच; झूम लिंकद्वारे थेट देखरेख, जिल्ह्यातील १३०७ वर्गांचे लाईव्ह रेकॉर्डिंग.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा