सांगली : पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर चार वंदे भारत गाड्यांचा थांबा असतानाही, सायंकाळी 4 ते 8 या वेळेत आरक्षण तिकीट काऊंटर बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे.
‘Railway Pravasi Group’ या प्रवासी संघटनेने X (Twitter) वर ही बाब उपस्थित करत @RailwaySeva यांना टॅग करून तक्रार नोंदवली होती. यावर RailwaySeva या रेल्वेच्या अधिकृत खात्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठवण्यात आल्याचे उत्तर दिले आहे.
किर्लोस्करवाडी हे सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक औद्योगिक नगर असून, प्रवासी व कामगारांची मोठी वर्दळ असलेले स्थानक आहे. वंदे भारतसारख्या गाड्यांचा थांबा असतानाही आरक्षण सुविधा मर्यादित वेळेत उपलब्ध असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा असून, आरक्षण काऊंटरची वेळ वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या विषयावर रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत निर्णय किंवा वेळापत्रक जाहीर होणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: धार्मिक ठिकाणांचा प्रचारासाठी वापर टाळा; पोलिस प्रशासनाचा स्पष्ट इशारा.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










