सांगली : पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण 10 कोटी 75 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
राज्यस्तरीय मूल्यांकनात जलसंधारण, वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त उपक्रम, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यांसारख्या घटकांवर झालेल्या कामाच्या आधारे सांगली जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये तासगाव प्रथम, मिरज द्वितीय आणि कवठेमहांकाळ तृतीय क्रमांकावर आहे. बोरगाव, कासेगाव, येडेनिपाणी, आळसंद, वाळेखिंडी, नांगोळे, लंगरपेठ, पिंपळवाडी, पेठ, सलगरे, अग्रण धुळगाव आणि अलकूड या ग्रामपंचायतींनी आपल्या लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
या पारितोषिकाच्या रकमेतून संबंधित ग्रामपंचायतींमधील पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्वच्छता उपक्रमांना चालना मिळणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनाही ‘सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे.
हेही वाचा: सलग दुसऱ्या दिवशी फिरला बुलडोझर; सांगली बसस्थानक-100 फुटी रोड परिसरातील 22 अतिक्रमणे हटवली.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









