सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची सूचना असून समृद्ध पंचायतराज अभियानाची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत असलेली ही मुदत आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सांगलीकडून देण्यात आली आहे.
समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे कामकाज, नोंदी, विविध उपक्रमांची अंमलबजावणी तसेच मूल्यांकनासाठी ही मुदत देण्यात आली होती. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये कामकाज अद्याप अपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर ही वाढीव मुदत देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतींनी अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी पूर्ण करणे, आवश्यक नोंदी व दस्तऐवजीकरण अद्ययावत करणे, तसेच ऑनलाइन माहिती वेळेत भरावी. यासोबतच ग्रामसभा, लोकसहभाग आणि शासकीय योजनांचा समन्वय साधून कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून ही वाढीव मुदत अंतिम संधी म्हणून पाहिली जावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ठरलेल्या कालावधीनंतर कामकाज अपूर्ण राहिल्यास त्याचा थेट परिणाम गुणांकन व मूल्यांकनावर होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून पारदर्शक, लोकाभिमुख आणि सक्षम ग्रामपंचायती घडवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी या वाढीव मुदतीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: कडेपूर अंगणवाडीत रंगली ‘यशोदा माता अंगत-पंगत’; जिल्हा परिषद CEO विशाल नरवाडे यांची भेट.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










