सांगली : कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीच्या स्वागतासाठी सांगली शहरात सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून आतिषबाजी केल्याप्रकरणी 14 जणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव नंदू साळसकर (रा. गवळी गल्ली, सांगली) हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास सांगलीत दाखल झाला. यावेळी त्याच्या समर्थकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, याप्रकरणी अभिजित नंदू साळसकर, साहिल सय्यद, अमित उर्फ गोट्या कांबळे, गणेश पवार, सूरज माने, अक्षय गायकवाड (सर्व रा. गवळी गल्ली, सांगली) आणि आकाश घबाडे (रा. सांगलीवाडी) यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी विशाल कोळी यांनी या प्रकरणाची फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा: सांगलीतील ‘या’ गावात चार वर्षांपासून दररोज केल जात आहे सामुदायिक राष्ट्रगीत गायन.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










