ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तासगाव तालुक्यातील एका गावाचा मतदानावर बहिष्कार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
ऐन निवडणुकीच्या तोंडावर तासगाव तालुक्यातील बलगवडे गावाचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय | प्रतिकात्मक छायाचित्र : Sangli Today

तासगाव : तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात प्रस्तावित सोलर प्रकल्पासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, याच पार्श्वभूमीवर ग्रामसभेत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

सोलर प्रकल्पासाठी गावातील गायरान क्षेत्रात असणारी हजारो झाडे तोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पर्यावरणाला हानी होणार असल्याने या प्रकल्पाला गावाकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. याबाबत प्रशासनाकडे निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

या मुद्द्यावरून यापूर्वी गावात बेमुदत उपोषण सुद्धा करण्यात आले होते. त्या आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठी जागा बदलण्याबाबत एकमत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पोलिस बंदोबस्तात वृक्षतोड झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊन असंतोष वाढला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीवरच ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याने केवळ मोजकेच प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहिले.

ग्रामस्थांनी ग्रामसभेत सर्वानुमते मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली असून, प्रशासनाच्या आश्वासनांवर आता विश्वास राहिला नाही, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: ‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये कराटे प्रशिक्षण; 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा