सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शहरातील विविध भागांत रिक्षा, वाहनांद्वारे प्रचार सुरू असतानाच, मोबाईलवर येणाऱ्या ऑटो-रिकॉर्डेड प्रचाराच्या कॉल्समुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभरात वारंवार प्रचाराशी संबंधित ऑटो-रिकॉर्डेड कॉल्स येत असून, काही नागरिकांना दिवसातून १० ते १२ वेळा असे कॉल्स येत असल्याचे सांगितले जात आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत येणाऱ्या या कॉल्समुळे वैयक्तिक कामांमध्ये अडथळा येत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार आणि पक्षांकडून प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. रस्त्यावर वाहनांद्वारे प्रचार, सोशल मीडियासह आता थेट मोबाईलवर कॉलद्वारे प्रचार हा देखील एक मार्ग बनत चालला आहे. मात्र, वारंवार येणाऱ्या कॉल्समुळे अनेक नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रचार हा लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असला तरी, मतदारांचा वैयक्तिक वेळ आणि मोबाईलवरील शांतता याबाबतही विचार होणे आवश्यक असल्याचे मत काही नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा: बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत तीन किंवा चार मत; ईव्हीएम मतदानाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाची माहिती.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










